Headlines

Heavy Rain | अवकाळी पावसाचा मोठा तडाखा, शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाचे मोठे नुकसान

Spread the love

Heavy Rain | सध्या वातावरण बिघडलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. कधी थंडी वाजत आहे तर कधी अवकाळी पाऊस कोसळत आहे. रविवारी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामध्ये अनेक ठिकाणी गारपीट आणि वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस कोसळला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

मागील दोन दिवसापासून पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात जोरदार पाऊस झाला आहे. यामुळे रब्बी हंगामातील ज्वारी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या ठिकाणच्या लोणी, धामणी, खडकवाडी गावातील शेतकऱ्यांच्या कांदा पिकाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचबरोबर इतर भागातही अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या शेत पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.

सध्या शेतकऱ्यांच्या कांद्याची काढणी सुरू आहे मात्र कांदा काढणीच्या वेळेला अवकाळी पाऊस आल्यामुळे शेतकऱ्यांच्या कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर मदत जाहीर करावी अशी मागणी आता शेतकरी करू लागले आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Add copyright symbol

Welcome To Krushi Salla

© Copyright, Krushi Salla