Headlines

कर्जाला कंटाळून शेतकऱ्याने केली आत्महत्या; मुलीने मुख्यमंत्र्यांना लिहिले भावनिक पत्र

Spread the love
हिंगोली जिल्ह्यातील सेगाव खोडके गावात आठव्या वर्गात शिकणाऱ्या एका शेतकऱ्याच्या मुलीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. त्यांनी या पत्रात म्हटले आहे की, माझे वडील देवाच्या घरी गेले आहेत. तुम्ही माझ्या बाबांना घरी परत पाठवा. माझ्या वडिलांना सांगा की तुमची मुलगी घरी वाट पाहत आहे…  
दरम्यान, मागच्या काही दिवसांपूर्वी सेगाव येथील शेतकरी नारायण खोडके यांनी शेतीतील नापिकी आणि कर्जाला कंटाळून आत्महत्या केली होती. मृत शेतकरी नारायण यांची मुलगी किरण खोडके हिने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून वडिलांची जाब विचारला आहे. वडिलांच्या मृत्यूला सरकारी यंत्रणाच जबाबदार असल्याचे त्यांचे मत आहे.
या मुलीने अत्यंत भावनिक पात्र एकनाथ शिंदे यांना लिहिले आहे. सध्या हे पत्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील झाले आहे. हे पत्र वाचल्यानंतर अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Add copyright symbol

Welcome To Krushi Salla

© Copyright, Krushi Salla