दरम्यान, मागच्या काही दिवसांपूर्वी सेगाव येथील शेतकरी नारायण खोडके यांनी शेतीतील नापिकी आणि कर्जाला कंटाळून आत्महत्या केली होती. मृत शेतकरी नारायण यांची मुलगी किरण खोडके हिने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून वडिलांची जाब विचारला आहे. वडिलांच्या मृत्यूला सरकारी यंत्रणाच जबाबदार असल्याचे त्यांचे मत आहे.
या मुलीने अत्यंत भावनिक पात्र एकनाथ शिंदे यांना लिहिले आहे. सध्या हे पत्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील झाले आहे. हे पत्र वाचल्यानंतर अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.