केंद्र सरकारने खरीप विपणन हंगाम 2023-24 साठी सोयाबीनचा एमएसपी 4600 रुपये प्रति क्विंटल निश्चित केला आहे. शेतकऱ्यांना त्याचा उत्पादन खर्च ३०२९ रुपये प्रति क्विंटल आहे, असा सरकारचा विश्वास आहे. यावर्षी सरकारने सोयाबीनच्या एमएसपीमध्ये 300 रुपयांची वाढ केली आहे. मात्र, बाजारात तेवढा भाव शेतकऱ्यांना मिळत नाही.
खरिपातील नगदी पीक म्हणून शेतकरी सोयाबीनची लागवड करतात. बाजारात नव्याने आलेले सोयाबीन विकले जात असताना 3800 ते 4100 रुपये प्रतिक्विंटल भाव आहे. त्यामुळे सरकारच्या धोरणांवर शेतकरी संताप व्यक्त करत आहेत. कारण यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांवर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. शेतकर्यांचा खर्च जेमतेमच भागणार असेल आणि शेतीतून नफा मिळणार नसेल, तर शेती करून काय फायदा? असा सवाल उपस्थित केला जात आहे.