भुईमूग पिकाची पेरणी होऊन ३५ ते ४० दिवस झाले असून फुले, शेंगाही येण्यास सुरुवात झाली आहे मात्र कमी पाऊस व दुष्काळामुळे भुईमुगाची उत्पादकता घटू शकते. त्यामुळे भुईमुगाला सिंचनाची गरज आहे. जर शेंगा आधीच तयार झाल्या असतील, तर झाडांच्या मुळांभोवती माती झाकून टाका, यामुळे शेंगांचा चांगला विकास होण्यास मदत होते आणि पीक उत्पादनातही वाढ होते. भुईमूग पिकामध्ये बोरॉनची कमतरता असल्यास ०.२ टक्के बोरॅक्स द्रावणाची फवारणी करावी आणि झिंकची कमतरता असल्यास ०.५ टक्के झिंक सल्फेट आणि ०.२५ टक्के चुना वापरावा.
उत्पादन कसे वाढवायचे
जे शेतकरी भुईमुगाची लागवड करत आहेत त्यांनी उत्पादन वाढवण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स पाळल्या पाहिजेत.शेतकऱ्यांनी पीक पेरल्यानंतर 40 दिवसांनी काही कीटकनाशकांची फवारणी करणे आवश्यक आहे.त्यासाठी इंडोल ऍसिटिक ऍसिड 0.7 ग्रॅम 7 मिली अल्कोहोलमध्ये मिसळा. ते 100 लिटर पाण्यात मिसळा. आणि पिकावर फवारणी करा. असे केल्यास तुम्हाला चांगला फायदा होईल.